आपल्या मायबोली मराठी आणि अहिराणी भाषेतील माझ्या काही चारोळ्या, कविता, थोडंफार केलेलं लिखाण या ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्या पर्यंत पोहचवण्यासाठी केलेला एक प्रामाणिक छोटेखानी प्रयत्न.. इथं मनमोकळं बिनधास्त हिंडा फिरा, अगदी आपल्या स्वतःच्या घरात, बगिच्यात फिरता तसं..

Saturday, November 30, 2019
Thursday, November 28, 2019
सत्यशोधक बा ज्योतिबा
"सत्यशोधक बा ज्योतिबा"
तळपता सूर्य तू
काळोखात मशाल बा,
पिढ्यांचा अंधार सम्पविला
सत्यशोधक तू ज्योतिबा
लकवा असतानाही बापा
तू डाव्या हाताने सत्यधर्म लिहिलास,
तुझ्या ह्याच लेखाने
कित्येक पिढ्या मुक्तकेल्यास
तू आयुष्यभर आम्हा
लेकरांसाठी लढला,
पण भीतीने कधी
मागे नाही हटला
जगण्याचा हक्क नाकारणारे
हे पाखंडी लोक आणि धूर्तच त्यांचे कर्म,
यांना काय कळणार
तुझा सत्यशोधक धर्म
जमणार आहे का ह्यांना
तुझे विचार जपणं,
तुझा विचारांचा वारसा
पिढ्यान पिढ्या चालवणं
याच तुझ्या ज्योतीची
आज मशाल झालीय,
तू दाखवलेल्या सूर्याने
इथली काळरात्र संपलीय
ह्याच ज्योतीतून
कित्येक सवित्र्या मुक्त केल्यात,
गुलामगिरी नष्ट करून
स्वतःच्या पायावर उभ्या केल्यात
बा ज्योतिबा
तुझा तो सत्यधर्म
राज्यघटनेत उतरला,
तुझा हा विचारांचा वारसा
आम्हीही पुढं पेलू बा
जगण्यास उमेद आणि लढण्यास बळ
तुझ्याच विचारातुन येते बा,
सत्यशोधक तू कायम
स्मरणात आहेस ज्योतिबा
- भावेश रातिलाल सोनार
बा ज्योतिबा
बा ज्योतिबा...
निबिड अंधारातून दूर करणारा तळपणारा सूर्य तू..
काळोखातली मशाल होऊन वाट दाखवत अन चालत गेलास,
आणि झालास सत्यशोधक...
तू लिहिलास सार्वजनिक सत्यधर्म, अर्धांग झाल्यावरही,
आमच्या बुद्धीला लागलेला लकवा घालवण्यासाठी, कैक पिढ्या मुक्त करण्यासाठी...
बेफिकीर होऊन बेडरपणे बाप होऊन,
आम्हा लेकरांसाठी लढताना तू भ्यायला नाहीस कधीही,
मारेकरी सुद्धा आपले केलेस...
जगण्याचा हक्क नाकारणारे हे पाखंडी धूर्त बगळ्यासारखे,
यांना काय कळणार तुझा सत्यशोधक धर्म अन त्यात सांगितलेलं मुक्त जगण्याचं वर्म....
तुझ्या विचारांचा वारसा पिढ्यानपिढ्या चालवणं,
तुझे विचार जपणं हे खायचं अन बेंबीवरून हात फिरवण्याचं काम नाहीय हे कळलंय त्यांना कधीच....
तू लावलेल्या वातीची ज्योत अन त्या ज्योतीची मशाल झालीय आता..
ती मशाल आता बुरसटलेल्या अंधारात तळपुन वाट दावतेय सत्याची, सूर्य बनून अगदी तुझ्यासारखीच.....
आज कित्येक सावित्री मुक्त झाल्यात, स्वतःच अस्तित्व सिद्ध करताहेत
तु घेतलेल्या पवित्र्यामुळे अन तिने घेतलेल्या शेणचिखलामुळे....
तुझा तो सत्यधर्म आजही राज्यघटनेत आहे, अन तो जगण्याचा प्रयत्न अन तुझी ती धुरा सांभाळण्याचा एक प्रयत्न मी नक्कीच करेल एक सत्यशोधक म्हणून....
जगण्याची ही उमेद अन संघर्षासाठी लागणार बळ,अन ऊर्जा या जीवाला तुझ्याच पासून मिळते, अन तू वाहतोस आजही नसानसातून ...
तू असाच तेवत राहा हे सत्यशोधक महासुर्या...
निबिड अंधारातून दूर करणारा तळपणारा सूर्य तू..
काळोखातली मशाल होऊन वाट दाखवत अन चालत गेलास,
आणि झालास सत्यशोधक...
तू लिहिलास सार्वजनिक सत्यधर्म, अर्धांग झाल्यावरही,
आमच्या बुद्धीला लागलेला लकवा घालवण्यासाठी, कैक पिढ्या मुक्त करण्यासाठी...
बेफिकीर होऊन बेडरपणे बाप होऊन,
आम्हा लेकरांसाठी लढताना तू भ्यायला नाहीस कधीही,
मारेकरी सुद्धा आपले केलेस...
जगण्याचा हक्क नाकारणारे हे पाखंडी धूर्त बगळ्यासारखे,
यांना काय कळणार तुझा सत्यशोधक धर्म अन त्यात सांगितलेलं मुक्त जगण्याचं वर्म....
तुझ्या विचारांचा वारसा पिढ्यानपिढ्या चालवणं,
तुझे विचार जपणं हे खायचं अन बेंबीवरून हात फिरवण्याचं काम नाहीय हे कळलंय त्यांना कधीच....
तू लावलेल्या वातीची ज्योत अन त्या ज्योतीची मशाल झालीय आता..
ती मशाल आता बुरसटलेल्या अंधारात तळपुन वाट दावतेय सत्याची, सूर्य बनून अगदी तुझ्यासारखीच.....
आज कित्येक सावित्री मुक्त झाल्यात, स्वतःच अस्तित्व सिद्ध करताहेत
तु घेतलेल्या पवित्र्यामुळे अन तिने घेतलेल्या शेणचिखलामुळे....
तुझा तो सत्यधर्म आजही राज्यघटनेत आहे, अन तो जगण्याचा प्रयत्न अन तुझी ती धुरा सांभाळण्याचा एक प्रयत्न मी नक्कीच करेल एक सत्यशोधक म्हणून....
जगण्याची ही उमेद अन संघर्षासाठी लागणार बळ,अन ऊर्जा या जीवाला तुझ्याच पासून मिळते, अन तू वाहतोस आजही नसानसातून ...
तू असाच तेवत राहा हे सत्यशोधक महासुर्या...
Thursday, September 5, 2019
बाबा
5 सप्टेंबर आला म्हणजे उत्सुकता असायची शिक्षक दिनाची आणि शिक्षक दिन म्हणजे नावालाच पण मी या दिवसाची खास वाट बघायचो याच कारण म्हणजे माझ्या बाबांचा (आजोबांचा) जन्मदिवस आणि बाबा शिक्षक होते. तर मला लहाणपणा पासूनच ते अगदी आता पर्यंत सुद्धा या गोष्टीच कुतूहल आहे की बाबा शिक्षक आणि नेमका शिक्षक दिनाच्या दिवशीच बाबांचा वाढदिवस. याचं मला खूप नवल की नेमका शिक्षक दिनाच्या दिवसाचाच बाबांचा जन्म. याच मला आचर्य वाटायचे कारण बाबा मास्तर होते.
मला आठवतंय लहानपणी अंगणवाडीत मी बाबांशिवाय जात नव्हतो. बाबा मला रोज तिथं नेऊन सोडायचे आणि घ्यायला पण यायचे. आणि मम्मी ने जरी डब्बा दिलेला असला तरी बाबांकडून रोजचा खाऊ ठरलेलाच असायचा. लहानपाणी लाड खूप केलेत बाबांनी. लहानपणी कधी कोणत्या गोष्टीसाठी हट्ट केला की मम्मी सरळ बाबांच्या पलंगावर नेऊन बसवायची, तिथं बसलो म्हणजे हलायला पण जागा नाही. मारायचे नाही पण भीती. रागवायचे तेवढ्या पुरता पण कधी मारलं नाही. जेवढा आदर होता तेवढाच दरारा पण, बाबांना सगळेच घाबरायचे.
शाळेत जातांना रोज बाबांकडून एक रुपया घ्यायचो. आणि तो दिवसभर पुरवायचो मी. शाळा भरण्याआधी २५ पैश्याच्या गोळ्या, मधल्या सुट्टीत २५ पैश्याच्या, जेवणाच्या सुट्टीत २५ पैश्याच्या, घरी येताना २५ पैश्याच्या. असा रुपयाचा तो ढोकळा मी पूर्ण दिवस पुरवायचो. आणि बाबांनी पण कधी रुपया द्यायला नकार दिला नाही. मी रुपया मागितला आणि बाबांनी नकार दिला असं कधीच झालं नाही. आणि आताच्या शंभर रुपयांच्या नोटेला सुध्या त्या रुपयांची सर नाही.
बाबांना नेहमी वाटायचं की मी मोठं होऊन नाव कमवाव, चांगलं शिकावं, चांगलं वागावं. सगळ्यांनी माझं नाव काढावं. ते मला सतत सांगत असत. अभ्यास केला तर मोठा होशील, मान मर्यादा, प्रतिष्ठा भेटेल. आणि मी सगळं ऐकायचो ही. बाकी कुणाची कोणती गोष्ट ऐकत नसलो तरी बाबांची कुठलीच गोष्ट टाळली नाही. बाबांची एक सवय होती, सातच्या बातम्या ऐकण्याची. सातच्या बातम्या ते रोज बघत असत. बातम्यांन मध्ये दाखवायचे मंत्री संत्री, सेलिब्रेटी लोक चारचाकी ने यायचे. ते बघून मी म्हणायचो
"बाबा, मोठा झालो की मी पण अशीच चारचाकी घेणार"
"आणि बाकी कुणालाच नाही, फक्त तुम्हालाच बसू देईल"
चारचाकी गाडीच स्वप्न माझं लहानपणा पासूनच आहे.
बाबा शिक्षक होते तर बाबांची पेंशन यायची. बाबांच्या पेंशन ची तारीख जवळ आली की बाबा सांगत
"बँकेत जाऊन ये आणि साहेबाना विचार की पेंशन कधी येणार ते"
मग मी मस्त रमत-गंमत बँकेत जायचो. जसा लै मोठा झालोय आणि साहेबांना विचारायचो
"अहो काका, पेंशन आलीय का"
"नाही" .....काका
"कधी येणार आहे" .....मी
"येईल तीन चार दिवसात" .....काका
"बरं"
आणि मग घरी गेलो की बाबांचा पहिला प्रश्न
"गेला होता का बँकेत"
"हो पण ते साहेब ते काका म्हणले की तीन चार दिवसात येईल"
"ठीक आहे, तीन चार दिवसात परत जाऊन बघ"
"हो जाऊन येईल ना"
मग तीन चार दिवसांनी पुन्हा बँकेत जायचं. पुन्हा विचारायचं, आली असल्यास जेवणं खावणं करून बाबांसोबत बँकेत जायचं तिथं टोकन घेऊन बसायचं. आलेल्या गेलेल्या लोकांची गंमत बघायची बँकेतील शिवाजी महाराजांचा फोटो बघायचो. महाराजांचं नातं लहानपणापासूनच जवळच आहे. तेव्हा पासून ते अगदी आजही कधी बँकेत गेलो की तो फोटो पाच दहा मिनिटं बघत बसतो. तेवढ्यात आमचा नंबर लागायचा. कॅशियर ने आवाज दिला की बाबांना सांगायचं, बाबा पैसे घ्यायचे आणि आम्ही दोघे सोबत घराकडची वाट पकडत निघायचो. बाबांची पेंशन घेऊन येताना झालेला आनंद स्वतःचा पहिला पगार झाला तेव्हापण नव्हता झाला. घरी यायचो मम्मी पप्पांना आणि बाबांना सांगायचो सांगायचो मी पण बाबांसारखा मास्तर होईल
"का"
कारण नोकरी नंतर सुद्धा पैसे मिळतात म्हणून मग बाबा सांगत त्यासाठी अभ्यास करावा लागतो, शाळा शिकावी लागते. मग कुठं...
मग त्यावेळी वाटायचं "खर आहे, आपण पण अभ्यास केला पाहीजेल म्हणजे चांगली नोकरी मिळेल." पण आता सरकारने पेंशनच बंद केली. असो..
बाबांचं माझ्या कडे अजून एक काम असायचं जेवण झालं की पाय चेपणे. रोजच नाही कधी कधी. पण कंटाळा कधीच नाही आला. बाबा कधी नाही म्हटले तर मीच म्हणायचो
"बाबा, आज पाय चेपायचे नाहींयत का?"
मग पाय चेपता चेपता बाबा गोष्टी सांगत शाळेत काय शिकवलं. शाळेत सरांनी सांगितलेल्या गोष्टी सांगायला लावत. आणि या गोष्टीचा काय बोध निघाला हे पण सांगत. पाढे पाठ घेत, शब्दार्थ विचारत, वाकप्रचार काय असतं ते सांगत, त्याचा अर्थ, वाक्यात उपयोग, संदर्भासह स्पष्टीकरण.. असा माझा अभ्यास करवून घेत.
बाबा नेहमी म्हणत "भावेश, माझ्या घराण्याची शान वाढवणार आहे." ऐकून उगाचंच खूप मोठं झाल्यावाणी वाटायचं. मग बाबा म्हणत आहेत न मग आपण तसच वागायचं तेच करायचं शान वाढवायची, बाबांचं नाव काढायचं हाच अट्टाहास माझा अजून आहे. मला चित्र काढायला लहानपणा पासून आवडायचं. मी काढलेली चित्र आवर्जून, कौतुकाने बघत. घरी कुणी पाहुणे आले की त्यांना पण सांगत. शाळेत असताना मला नवनीत चित्रकला स्पर्धेत बक्षीस मिळालं होतं. बाबांना तेव्हा खूप आनंद झाला होता. कोणतीही गोष्ट असली की बाबांना सांगायचो. अभ्यासात अडचण आली की बाबांना सांगायचो. आणि बाबा प्रत्येक गोष्टीच समाधान कारक उत्तर देत असत. चार लोकांमध्ये कसं बसावं, कसं बोलावं, ओळखी, नाती गोती सांभाळणं असल्या सगळ्या गोष्टी त्यांनी शिकवल्या. पुढं दहावीला 76% मार्क्स मिळाले तर सगळ्यांना कौतुकाने सांगत होते. मिळालेल्या मार्क्स पेक्षा मला बाबांनी केलेल्या कौतुकातच जास्त आनंद वाटायचा.
"मग आता पुढं काय करायचं ठरवलं तू" .....बाबा
"बारावी सायन्स करतो आधी" .....मी
"बरं ठीक आहे, चांगलं आहे" .....बाबा
पुढं बारांवी झाली सगळ्याची इच्छा होती डिप्लोमा किंवा इंजिनियरिंग करावी. पण मला ह्या असल्या कोणत्याच गोष्टीत इंटरेस्ट नव्हता. मला लहानपणा पासूनच चित्रकलेची आवड. यातच शिक्षण घ्यावं आणि करियर करावं अशी माझी प्रचंड इच्छा होती. सगळ्याचा विरोध असतांना सुद्धा मी या क्षेत्रामध्ये आलो. सगळ्यांचा विरोध असला तरी बाबांचा मला फुल्ल सपोर्ट होता. बाबा त्यांना सांगत "करू दे, तो जे करेल ते चांगलंच करेल माझा विश्वास आहे." बाबांच्या सपोर्ट मुळेच मी या क्षेत्रात आलो. कॉलेज सुरू झालं तेव्हा बाबा पलंगावरच पडून होते. त्यांच्या कमरेतले हाड तुटले होते. ते आता उठू बसू शकत नव्हते. चालू शकत नव्हते. कुणाच्यातरी मदतीने ते उठबस करू शकायचे. जेवण खावण, संडास, बाथरूम सगळं पलंगावरच. कारण पलंगावरून उतरुच शकत नव्हते. ह्या सगळ्या गोष्टी आमच्या घरच्यांनी केल्यात. किळस आली तरी कधी दुर्लक्ष नाही झालं. कुठल्या गोष्टीची कमी नाही पडू दिली. एवढं सिरीयस असून सुद्धा बाबा रोज विचारायचे आज कॉलेज मध्ये काय शिकवलं. तू कोणतं नवीन चित्र काढलं. दिसत नसलं तरी पाच मिनिटं बघायचे. मीही सगळेच चित्र बाबांना दाखवायचो. स्पर्धेमध्ये हे चित्र पटवतोय बाबा, आज परीक्षा आहे, आज निकाल लागला, पास झालो. ह्या सगळ्या गोष्टी सांगायचो. माझ्यापेक्षा निकालाची जास्त उत्सुकता बाबांनाच असायची.
आणि एके दिवशी बाबा मला म्हणाले
"नुसतेच चित्र काढतो, त्याला काही बक्षीस मिळेल असं काहीतरी काढायला हवं तू."
"हो बाबा, काढेल ना अजून तर सुरवात आहे." .....मी
"काय सुरवात आहे, असं कुठं असतं का." .....बाबा
प्रथम वर्षाला मी बाबांच व्यक्तीचित्र काढलं. अर्थात तो विषय मला तेव्हा नव्हता. दोन काढले होते एक पेन्सिल स्केच आणि दुसरं वाटरकलर मध्ये. दोघेही बऱ्यापैकी झाले होते. म्हणजे मला आवडले होते. सगळ्यांनीच कौतुक केलं. बाबांनी पण..
कॉलेजला वार्षिक संमेलन होत माझ्या "14 फेब्रुवारी आणि 15 फेब्रुवारी" आणि दरवर्षी वार्षिक संमेलनाला वार्षिक चित्रप्रदर्शन असतं. वर्षभरातील सगळे विद्यार्थ्यांचे चित्र त्या प्रदर्शनाला लावली जात. माझे पण काही चित्रे होती. त्यात बाबांचं ते वाटरकलर मध्ये मी केलेलं आयुष्यातलं पहिलं व्यक्तिचित्र पण होत. प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 फेब्रुवारी 2014 ला बक्षीस वाटप म्हणजे प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम होता. आणि योगायोग असा की माझ्या त्या व्यक्तिचित्राला पहिला नंबर आला. लै खुश झालो मी तर. घरी सगळ्यांना आवडलेलं चित्र त्याला प्रमाणपत्र मिळालं एक नंबरच ते तर अजून खुश होतील. मी तर खुश होतोच. आणि बाबा म्हटले होते "बक्षिसे मिळायला हवं असं चित्र काढ" आणि त्याच्याच चित्राला बक्षीस मिळालं. खूप आनंद होईल ऐकून बाबांना. मला तर कधी कॉलेज मधून घरी जातो आणि हे प्रमाणपत्र बाबांना दाखवतो आणि सांगतो असं झालं. तेवढ्यात पप्पांचा फोन पण आला होता. कुठं आहे, कितीवेळ लागेल पटकन घरी ये म्हणून.
आनंदाच्या ओघात हसत खेळत घरी यायला निघालो होतो. गाडीला थोडा अर्धातास उशीर होता. रस्त्यात होतो तोवर गावाकडून मित्राचा फोन आला.
"हॅलो, भावेश"
"हा बोल रे"
"तुला काही कळालं का"
"कसलं रे"
"घरून फोन नाही आला"
"आला होता, पण घरी ये एवढंच म्हटले"
"अरे, बाबा वारले रे तुझे आताच..!"
एवढं ऐकून त्याच्याशी पुढं काय बोलावं याच भान नव्हतं मला. पाया खालची जमीन हल्ली माझ्या. फोन कट करून निःशब्द होऊन जागेवर स्तब्ध तसाच उभा राहिलो. डोळ्यात आसवांनी गर्दी करायला सुरुवात केली. पाणावलेले डोळे, आजूबाजूला काय चाललंय सगळं विसरलो मी. डोक्यात सगळे विचाराचे थैमान माजले. बाबांचं आवाज.. बक्षीस.. पेंटिंग.. अवार्ड.. प्रमाणपत्र.. आणि बाबांचा मृत्यू.. हे सगळं खोटं असलं असतं तर फार बरं झालं असतं. सोबतच्या मित्राने दिलेल्या आवाजाने मी भानावर आलो. हळुवार पावले टाकत स्टेशनवर आलो. घरी जायची अजिबात इच्छा नव्हती.. आणि त्या अगोदरच्या रात्री मला जवळ बोलावल होत. त्यांना काहीतरी सांगायचं होत मला. पण बोलता येत नव्हतं. काय सांगत असतील ते.. अजून ही हा विचार बऱ्याच वेळा येतो. सगळ्या गोष्टी अचानक घडून गेल्यात मला काय करावं अजून सुचत नाहीय. आता बाबा सोबत नाहीयत बाबांची फक्त आठवण सोबत आहे..
मी नोकरीला लागलो शाळेत तेव्हा वाटायचं आता बाबा असते तर.. डिग्री पास आऊट झालो आता बाबा असते तर.. आता सर्व काही त्याच्या मनासारखं करतोय.. होतंय.. आता बाबा असते तर..
आता बाबा नाहीयेत पण ते आठवणीतुन कायम स्मरणात आहेत. त्याचा आशीर्वाद आहेच.. पण खंत एकच आहे मनी.. आता बाबा नाहींयत...
Thursday, August 29, 2019
Sunday, August 11, 2019
खान्देशचा इतिहास, अहिराणी भाषा आणि कानबाई
खान्देशचा इतिहास, अहिराणी भाषा आणि कानबाई
प्रत्येक भाषेच्या अंतर्गत अनेक बोलीभाषा आहेत. या प्रत्येक बोलींना भाषेचेच रूप आहे. यामुळे सम्पूर्ण महाराष्ट्रात दर 15 ते 20 किमी पर्यंत भाषा बदलत जाते. वर्हाडी, नागपुरी, कोल्हापुरी, कोकणी, अग्री, कोळी अशा एक ना अनेक बोली भाषा सम्पूर्ण महाराष्ट्राच्या मातीत प्रत्येक भागात बोलल्या जातात. यासगळ्या बोली भाषा आहेत यातल्या यात पण अजून काही या बोली भाषेचे उपप्रकार आहेत. खान्देशात बोलली जाणारी ही बोली ही एक इथली महत्वाची बोली भाषा आहे. यात पण थोड्या प्रमाणात उपप्रकार आहेतच. इतर भाषीय लोकांना बोलायला, समजायला, कळायला थोडी अवघड ही अहिराणी भाषा आहे. या अहिराणी बोलीत गीत, ओव्या आणि काव्य यात झालेले सामाजिक चित्रण इथल्या समाजाचे चित्रच डोळ्या समोर उभं करत. आपल्या भावनांना नकळत आकार देतात. सण, उत्सव, यात्रा, लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम, कुटुंबातील नाते, गाव गाडे, मंदिरे सर्वच या बोलीत प्रकट होतात. एवढे असूनहू या भाषेतील काव्य ग्रंथ, साहित्य, फारसे प्रकाश श्रोतात नाहीत. आणि जे काही आहेत ते अद्याप हवे तसे, समाजाच्या समोर आलेले नाहीत, प्रत्येक खान्देशी माणसाचे भाषेवर अमाप प्रेम आहे. पण तरीही यातल्या काही लोकांना अहिराणी बोलण्याची, ऐकण्याची कोण लाज वाटते काय माहिती. पण काही लोक मात्र नित्याने ही भाषा बोलतात. तिचा आदर सन्मान करतात, गर्व आहे अश्या खान्देशी माझ्या मित्र, भाऊ, काक, मामा यांचा, तेवढाच हेवा ही वाटतो.
प्रत्येक भाषेच्या अंतर्गत अनेक बोलीभाषा आहेत. या प्रत्येक बोलींना भाषेचेच रूप आहे. यामुळे सम्पूर्ण महाराष्ट्रात दर 15 ते 20 किमी पर्यंत भाषा बदलत जाते. वर्हाडी, नागपुरी, कोल्हापुरी, कोकणी, अग्री, कोळी अशा एक ना अनेक बोली भाषा सम्पूर्ण महाराष्ट्राच्या मातीत प्रत्येक भागात बोलल्या जातात. यासगळ्या बोली भाषा आहेत यातल्या यात पण अजून काही या बोली भाषेचे उपप्रकार आहेत. खान्देशात बोलली जाणारी ही बोली ही एक इथली महत्वाची बोली भाषा आहे. यात पण थोड्या प्रमाणात उपप्रकार आहेतच. इतर भाषीय लोकांना बोलायला, समजायला, कळायला थोडी अवघड ही अहिराणी भाषा आहे. या अहिराणी बोलीत गीत, ओव्या आणि काव्य यात झालेले सामाजिक चित्रण इथल्या समाजाचे चित्रच डोळ्या समोर उभं करत. आपल्या भावनांना नकळत आकार देतात. सण, उत्सव, यात्रा, लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम, कुटुंबातील नाते, गाव गाडे, मंदिरे सर्वच या बोलीत प्रकट होतात. एवढे असूनहू या भाषेतील काव्य ग्रंथ, साहित्य, फारसे प्रकाश श्रोतात नाहीत. आणि जे काही आहेत ते अद्याप हवे तसे, समाजाच्या समोर आलेले नाहीत, प्रत्येक खान्देशी माणसाचे भाषेवर अमाप प्रेम आहे. पण तरीही यातल्या काही लोकांना अहिराणी बोलण्याची, ऐकण्याची कोण लाज वाटते काय माहिती. पण काही लोक मात्र नित्याने ही भाषा बोलतात. तिचा आदर सन्मान करतात, गर्व आहे अश्या खान्देशी माझ्या मित्र, भाऊ, काक, मामा यांचा, तेवढाच हेवा ही वाटतो.
![]() |
खान्देशचा नकाशा |
इ. स. पूर्व १ ते २ शतकापासून ख्रिस्ती शतकाच्या सुरवातीपर्यंत खान्देश बौद्धधर्मीय राजाच्या छत्राखाली होता. खान्देशचा प्राचीन इतिहास 'तोरणमाळ' व 'अशिरगड' या दोन डोंगरी किल्यांशी निगडित आहे. ४व्या शतकाच्या उत्तरार्धात नाशिक येथे 'विरसेन' नावाचा अहिर राजा राज्य करीत असल्याची नोंद आहे. त्यामुळे या भागात 'अहिर' संस्कृतीची पालेमुळे रुजली. इ. स. १००० ते १२०० या काळात अशिरगडचा परमार वंशीय 'तक' आडनावाच्या राजपूत राजाने व पूढे 'पाटण' येथील निकुंभ वंशीय राजाचे येथे राज्य होते. हा राजा शिवभक्त होता. निकुंभ वंशीय 'सोनाळदेव' राजाच्या कारकिर्दीत इ. स. १२०६ मध्ये भागरे येथील जैन गुहा, मनमाड जवळील 'अंकाई' डोंगरातील जैन गुहा व चाळीसगाव तालुक्यातील पाटणा येथे 'ब्राम्हण गुहा' खोदली गेली. १३व्या शतकात अशिरगडच्या राजाचा पराभव करून चौहान राजे खान्देशावर राज्य करू लागले ते स्वतःस खान्देशचे राजे म्हणून घेत. देवगिरीकट स्वारी करून अल्लाउद्दीन खिलजीने सन १२२९ मध्ये खान्देशची लूट केली व चौहान घराण्याचा नायनाट केला. १३२३ पासूनच खान्देशवर महंमद तुलघल यांचे वर्चस्व होते. इ.स.१३७० ते १३९९ साली दिल्लीचा बादशहा फिरोजशहा तुघलघ याने मालिकराज फरुकी याला खान्देशचा सेनापती नेमले.
माळव्याचा राजा दिलावरखान याच्या मुलीशी मालिक अहमद उर्फ मलिक राजा याचा मुलगा मलीनसर यांचे लग्न झाले. यामुळे खान्देशात मलीक राजाचे वर्चस्व वाढीस लागले. मालिकने अशिरगडच्या राजाला फसवून ताब्यात घेतला. थाळनेर ता.शिरपूर जि.धुळे जिंकले आणि सुलतानपुरावर स्वारी केली. गुजरातच्या अहमद राजाने त्याला खान ही पदवी बहाल केली. यानंतर मिरान, आदिलखान, मिरान मुबादिक, आदिलखान, दाऊदखान, गझनीखान, दुसरा आदिलखान, मुबरीक खान, दुसरा मिरान मुहम्मद, राजा अलिखान अशा अनेक प्रमुखांनी खान्देशच्या प्रदेशावर १५व्या शतकापर्यंत राज्य केले. याच बरोबर इ.स.१४१७ मध्ये फरुकी राजाच्या (खान्देशचा राजा) मलीक नासीर या दुसऱ्या मुलास खान ही पदवी गुजरातच्या पहिला अहमद या राजाने दिली. अबुल फजलच्या 'पेने अकबरी' प्रमाणे खान्देश म्हणजे खाजाचा देश अशी उपपत्ती आहे. परंतु ज्या अर्थी फेरीस्तानेही आपल्या वर्णनात खान्देशचा उल्लेख केलेला आहे त्या अर्धी हे नाव त्यापूर्वीचे जुने ही असावे.
'मिसिक्लेर' च्या नावाने एक इतिहास संशोधक श्री.के.बी.मराठे व मिस्टर विल्सन यांच्या मते खान्देश हे नाव 'खांडव वन' यावरून आले असावे. महाभारतात 'तोरण माळ' (धुळे जिल्हा) च्या राजाशी पांडवाचे युद्ध झाल्याचा उल्लेख आहे.अर्जुनाने पांडव वन जाणून ही भूमी लागवडीस व वसाहतीस योग्य अशी केली, खान्देशच्या उत्पत्तीवर मात्र अभ्यासकांचे अजूनतरी एकमत नाहीये.
जळगांव व धुळे हे दोघे जिल्हे पूर्वी एकच होते, यालाच खान्देश असे नाव होते. सन १९०६ साली त्याचे दोन विभाग करण्यात आले. पूर्व खान्देश(जळगांव) व पश्चिम खान्देश(धुळे) अशी नावे त्यांना देण्यात आली. महाराष्ट्र राज्य निर्मिती नंतर पूर्व खान्देश याला जळगांव व पश्चिम खान्देश याला धुळे अशी नावे देण्यात आली.
खान्देश हे नाव अहिराणी भाषिक प्रदेशाला कसे मिळाले यावर दुमत असले तरी रामायणाच्या काळात हा भाग 'कृषिक' या नावाने उल्लेखिला आहे. खान्देशात पूर्वी अभिर लोकांची वस्ती होती. अहिर हे शक कुशाणाप्रमाणे परकीय आहेत. व ते भारताबाहेरून भारतात आले. आभीर पासून अहिर या शब्दाची उत्पत्ती झाली असे अभ्यासकांचे मत आहे. अहिर हे यदुवंशीय आर्य असावेत. कारण ते कृष्णाची पूजा करीत कन्हेर म्हणजे कृष्ण, कन्हेरदेश म्हणजे खान्देश कानबाईचा उत्सव फक्त खान्देशातच साजरा करतात. म्हणून काही अभ्यासक हे मत ग्राह्य धरतात.
खान्देशातील राजाला मुलगा झाला म्हणून त्याने सध्या राज्यला पुरणपोळीचे निमंत्रण दिले त्याला खानभाईचे रोट म्हणत यातूनच पुढं कानबाई व रानबाईचे रोट ही परंपरा चालत आली. असही काही जुनी गावकरी सांगत असतात. एकूणच एकमत नाहीच आहे. अधिक काही माहिती सामोरी आलीच तर पुन्हा लिहून तुमच्यापर्यंत पोहचवली जाईल.
माळव्याचा राजा दिलावरखान याच्या मुलीशी मालिक अहमद उर्फ मलिक राजा याचा मुलगा मलीनसर यांचे लग्न झाले. यामुळे खान्देशात मलीक राजाचे वर्चस्व वाढीस लागले. मालिकने अशिरगडच्या राजाला फसवून ताब्यात घेतला. थाळनेर ता.शिरपूर जि.धुळे जिंकले आणि सुलतानपुरावर स्वारी केली. गुजरातच्या अहमद राजाने त्याला खान ही पदवी बहाल केली. यानंतर मिरान, आदिलखान, मिरान मुबादिक, आदिलखान, दाऊदखान, गझनीखान, दुसरा आदिलखान, मुबरीक खान, दुसरा मिरान मुहम्मद, राजा अलिखान अशा अनेक प्रमुखांनी खान्देशच्या प्रदेशावर १५व्या शतकापर्यंत राज्य केले. याच बरोबर इ.स.१४१७ मध्ये फरुकी राजाच्या (खान्देशचा राजा) मलीक नासीर या दुसऱ्या मुलास खान ही पदवी गुजरातच्या पहिला अहमद या राजाने दिली. अबुल फजलच्या 'पेने अकबरी' प्रमाणे खान्देश म्हणजे खाजाचा देश अशी उपपत्ती आहे. परंतु ज्या अर्थी फेरीस्तानेही आपल्या वर्णनात खान्देशचा उल्लेख केलेला आहे त्या अर्धी हे नाव त्यापूर्वीचे जुने ही असावे.
'मिसिक्लेर' च्या नावाने एक इतिहास संशोधक श्री.के.बी.मराठे व मिस्टर विल्सन यांच्या मते खान्देश हे नाव 'खांडव वन' यावरून आले असावे. महाभारतात 'तोरण माळ' (धुळे जिल्हा) च्या राजाशी पांडवाचे युद्ध झाल्याचा उल्लेख आहे.अर्जुनाने पांडव वन जाणून ही भूमी लागवडीस व वसाहतीस योग्य अशी केली, खान्देशच्या उत्पत्तीवर मात्र अभ्यासकांचे अजूनतरी एकमत नाहीये.
जळगांव व धुळे हे दोघे जिल्हे पूर्वी एकच होते, यालाच खान्देश असे नाव होते. सन १९०६ साली त्याचे दोन विभाग करण्यात आले. पूर्व खान्देश(जळगांव) व पश्चिम खान्देश(धुळे) अशी नावे त्यांना देण्यात आली. महाराष्ट्र राज्य निर्मिती नंतर पूर्व खान्देश याला जळगांव व पश्चिम खान्देश याला धुळे अशी नावे देण्यात आली.
खान्देश हे नाव अहिराणी भाषिक प्रदेशाला कसे मिळाले यावर दुमत असले तरी रामायणाच्या काळात हा भाग 'कृषिक' या नावाने उल्लेखिला आहे. खान्देशात पूर्वी अभिर लोकांची वस्ती होती. अहिर हे शक कुशाणाप्रमाणे परकीय आहेत. व ते भारताबाहेरून भारतात आले. आभीर पासून अहिर या शब्दाची उत्पत्ती झाली असे अभ्यासकांचे मत आहे. अहिर हे यदुवंशीय आर्य असावेत. कारण ते कृष्णाची पूजा करीत कन्हेर म्हणजे कृष्ण, कन्हेरदेश म्हणजे खान्देश कानबाईचा उत्सव फक्त खान्देशातच साजरा करतात. म्हणून काही अभ्यासक हे मत ग्राह्य धरतात.
खान्देशातील राजाला मुलगा झाला म्हणून त्याने सध्या राज्यला पुरणपोळीचे निमंत्रण दिले त्याला खानभाईचे रोट म्हणत यातूनच पुढं कानबाई व रानबाईचे रोट ही परंपरा चालत आली. असही काही जुनी गावकरी सांगत असतात. एकूणच एकमत नाहीच आहे. अधिक काही माहिती सामोरी आलीच तर पुन्हा लिहून तुमच्यापर्यंत पोहचवली जाईल.
![]() |
खान्देशातील कानबाई |
Friday, August 2, 2019
कसाय ना हा पाऊस
कसाय ना हा पाऊस
कसाय ना हा पाऊस
साधा तीन अक्षरांचा एक शब्द
पण या एका शब्दाचे किती रूप
कधी रिमझिम तर कधी धो धो बरसणारा
कधी ऊन कधी पाऊस
मधेच सप्तरंगी इंद्रधनुष्य दाखवणारा
पावसाच्या प्रत्येक थेंबाला ओढ
जमिनीवर येण्याची
कधी तो शिंपल्यात तर कधी घराच्या पत्रावर
कधी चातकाच्या चोचीत तर कधी मनसोक्त नाचणाऱ्या मयूरावर
कधी इवल्याशा रोपट्यावर तर कधी घनदाट वृक्षावर
कधी वेळेवर येऊन शेतकऱ्याला आनंद देतो
पाऊसच हा..
कधी प्रेमाची साथ देतो
कधी आठवणीत चिंब भिजवतो
कधी नकळत आपले अश्रू स्वतःमध्ये सामावून घेतो
कधी तिच्या येण्याची चाहूल देणारा
तर कधी रडायला लावणारा
कधी मनसोक्त भिजण्याचा मोह पाडणारा
तर कधी महापुरात घर ची घरे वाहून घेऊन जाणारा
कधी कधी हवा हवासा
मध्येच डोक्यात जाणार
पाऊस हा..!
-भावेश सोनार
आज हृदय रडत होतं !
आज हृदय रडत होतं !
आज हृदय रडत होतं !
खरंच सांगतोय मी
आज हृदय रडत होतं,
का ते माहीत नाही
कुणासाठी तरी झुरत होतं.
विचारलं तर म्हणले
असुदे तुला काय करायचंय,
म्हटलं जा निघे
तुला असं पण लवकर मरायचंय.
डोळ्यातून येणारे अश्रू
रोखत होत सारखं ते,
हसू सुद्धा नव्हतं
साथ देत होते मनापासून ते.
हृदयाला हवा होता
त्रास तो नेहमी झालेला,
नव्याने पूर्वी सारखाच
नकळत नेहमी अनुभवलेला.
ते पुन्हा मला म्हणाले
खरंच गरज नव्हती गुंतायची
म्हटलो, तुला सवय आहे
नेहमी माती खायची.
खरंच सांगतोय मी
आज हृदय रडत होतं !
- भावेश रतिलाल सोनार ©
आज हृदय रडत होतं !
खरंच सांगतोय मी
आज हृदय रडत होतं,
का ते माहीत नाही
कुणासाठी तरी झुरत होतं.
विचारलं तर म्हणले
असुदे तुला काय करायचंय,
म्हटलं जा निघे
तुला असं पण लवकर मरायचंय.
डोळ्यातून येणारे अश्रू
रोखत होत सारखं ते,
हसू सुद्धा नव्हतं
साथ देत होते मनापासून ते.
हृदयाला हवा होता
त्रास तो नेहमी झालेला,
नव्याने पूर्वी सारखाच
नकळत नेहमी अनुभवलेला.
ते पुन्हा मला म्हणाले
खरंच गरज नव्हती गुंतायची
म्हटलो, तुला सवय आहे
नेहमी माती खायची.
खरंच सांगतोय मी
आज हृदय रडत होतं !
- भावेश रतिलाल सोनार ©
Wednesday, July 31, 2019
चित्रकार गोपाळ देऊसकर
चित्रकार गोपाळ देऊसकर
![]() |
फोटो सौजन्य: गुगल |
या ब्लॉगचेस्वरूप बघता हे कलासमक्षेचे नाही किंवा यात अंतर्भूत असणार्या कलावंतांचे निव्वळ चरित्र सांगणारे नाही. सदर ब्लॉग महाराष्ट्रातील ज्या चित्रकाराबद्दल सांगावेसे वाटते अशा व्यक्तिचित्रकाराचे हे लिखाण आहे.
“चित्रकार गोपाळ देऊसकर” या ब्लॉग मध्ये व्यक्तिचित्रकार गोपाळ देऊसकर यांचे चरित्र, वैशिष्ट यांचे प्रतिबिंब कथानकातून उलगडत जात. चित्रकार गोपाळ देऊसकर यांच्या विषयी लिहिताना या प्रबंधात यांच्या बद्दल कथा, आख्यायिका, आठवणी, दंतकथा, अशा अनेक गोष्टींचा वापर करून लिखाणाचा प्रयत्न केला आहे.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पोर्ट्रेट पेंटर म्हणून गोपाळ देऊसकर यांची जगभरात ओळख आहे. देऊसकरांनी मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट इथून जी. डी. आर्ट ही पदविका घेतल्यानंतर, इंग्लंडच्या रॉयल अकादमी येथेही चित्रकलेचे शिक्षण घेतले. रॉयल अकादमीच्या वासंतिक प्रदर्शनात सतत पाच वर्ष त्याच्या चित्रांची निवड झाली आहे. जगभरातील विविध कलासंग्रहांचा त्यांनी अभ्यास केला होता. जयपूर, बडोदा, पालनपूर, कूचबिहार यासारख्या संस्थानात राजचित्रकार म्हणून राज्यांची आणि राण्यांची व्यक्तिचित्रे त्यांनी केली. आपल्याकडे पेस्तनजी बोमनजी यांच्यापासून व्यक्तिचित्रे करणाऱ्या चित्रकारांची जी परंपरा आहे, त्यात गोपाळ देऊसकरांना एक वेगळं आणि महत्त्वाचं स्थान आहे. सर्वसामान्यांना देऊसकर परिचित आहेत ते ‘टिळक स्मारक मंदिर’ आणि ‘बालगंधर्व रंगमंदिरा’तील अनुक्रमे लोकमान्-य टिळक आणि बालगंधर्वांच्या व्यक्तिदर्शनात्मक चित्रांमुळे. चित्रकलेच्या क्षेत्रात त्यांच्या कामाइतक्याच त्यांच्याबद्दलच्या खऱ्याखोट्या वदंता प्रसिद्ध आहेत.
गोपाळ देऊसकर हे मराठी चित्रकार होते. १९२७-३६ दरम्यान मुंबईच्य जे.जे. स्कूल ऑफ आर्ट या मानांकित संस्थेत त्यांनी चित्रकलेचे पद्धतशीर प्रशिक्षण घेतले. पुढे निजामाने खास शिष्यवृत्ती देऊन चित्रकलेच्या प्रगत अभ्यासाकरता त्यांना युरोपात पाठवले. १९३४, १९३६, १९३८ साली लंडनमधील चित्रप्रदर्शनांत त्यांची चित्रे मांडण्यात आली होती. भारतात परतल्यावर त्यांना जे.जे. स्कूल ऑफ आर्ट संस्थेच्या डेप्युटी डायरेक्टर पदावर नेमले गेले. त्यांच्या चित्रकौशल्यामुळे बाँबे आर्ट सोसायटीने त्यांना सुवर्णपदक देऊन गौरवले. पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिर, टिळक स्मारक मंदिरातील त्यांनी रंगविलेली भित्तिचित्रे अतिशय प्रसिद्ध आहेत. फेब्रुवारी ८, १९९४ रोजी त्यांचे निधन झाले.
देऊसकर कुटुंब हे मूळचे देवास,मध्यप्रदेश येथील होते, पण नंतर अहमदनगर येथे स्थायिक झाले.तीन पिढ्यांपासून देऊसकर यांच्या घरात कलेची पार्श्वभूमी होती. त्यांचे आजोबा वामन आणि त्यांचे वडील हे मूर्तिकार होते. गोपाळ यांचे वडील मिशन हायस्कूलमध्ये चित्रकला शिक्षक होते.मोठे काका रामकृष्ण देऊसकर हे विसाव्या शतकातील गाजलेले चित्रकार होते. हैदराबाद येथील सालारजंग वस्तू संग्रहालयाच्या उभारणीत नबाबासोबत त्यांचे महत्वाचे योगदान होते.म्युझियमचे ते पहिले क्युरेटर होते.
गोपाळ देऊसकर हे दोन वर्षाचे असताना आलेल्या फ्लूच्या साथीत आई आणि वडील यांचा मृत्यू झाला. ते आणि त्यांची मोठी बहिण शांता हिचा १९२१ पर्यंत नातेवाइकांनी सांभाळ केला.नंतर ते हैदराबाद येथे रामकृष्ण देउसकर या काकांकडे सहा वर्षे राहिले. १९२७ साली त्यांनी मुंबईच्या सर जे.जे.स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला.सुरुवातीस ते खेतवाडी येथे ललितकलादर्श या नाटकमंडळीच्या बिऱ्हाडात राहिले.
चित्रकार गोपाळ देऊसकर ही कहाणी आहे त्यांच्या चित्रनिर्मितीची. बालपणीच त्यांच्यातले चित्रगुण प्रकटले. उत्तरोत्तर ते बहरत गेले. या कलेच्या जोरावर ते इंग्लंडला जाऊन रॉयल ऍकॅडमीत शिकले. भारतीय संस्थानिकांच्या राजवाडयातून वावरले. पुण्याच्या 'टिळक स्मारक मंदिरा'तील लोकमान्य टिळक जीवनदर्शन आणि 'बालगंधर्व रंगमंदिरा'तील बालगंधर्व त्यांच्या कुंचल्यातून साकार झाले. त्यांच्या कॅनव्हासवर कोटयवधींचे दागिने ल्यालेली राणी उमटली, तशीच दूध विकणारी खेडूत स्त्रीही! अशी त्यांची कित्येक चित्रे! ही कहाणी आहे देऊसकरांच्या व्यक्तिगत जीवनाची.
“चित्रकार गोपाळ देऊसकर” या ब्लॉग मध्ये व्यक्तिचित्रकार गोपाळ देऊसकर यांचे चरित्र, वैशिष्ट यांचे प्रतिबिंब कथानकातून उलगडत जात. चित्रकार गोपाळ देऊसकर यांच्या विषयी लिहिताना या प्रबंधात यांच्या बद्दल कथा, आख्यायिका, आठवणी, दंतकथा, अशा अनेक गोष्टींचा वापर करून लिखाणाचा प्रयत्न केला आहे.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पोर्ट्रेट पेंटर म्हणून गोपाळ देऊसकर यांची जगभरात ओळख आहे. देऊसकरांनी मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट इथून जी. डी. आर्ट ही पदविका घेतल्यानंतर, इंग्लंडच्या रॉयल अकादमी येथेही चित्रकलेचे शिक्षण घेतले. रॉयल अकादमीच्या वासंतिक प्रदर्शनात सतत पाच वर्ष त्याच्या चित्रांची निवड झाली आहे. जगभरातील विविध कलासंग्रहांचा त्यांनी अभ्यास केला होता. जयपूर, बडोदा, पालनपूर, कूचबिहार यासारख्या संस्थानात राजचित्रकार म्हणून राज्यांची आणि राण्यांची व्यक्तिचित्रे त्यांनी केली. आपल्याकडे पेस्तनजी बोमनजी यांच्यापासून व्यक्तिचित्रे करणाऱ्या चित्रकारांची जी परंपरा आहे, त्यात गोपाळ देऊसकरांना एक वेगळं आणि महत्त्वाचं स्थान आहे. सर्वसामान्यांना देऊसकर परिचित आहेत ते ‘टिळक स्मारक मंदिर’ आणि ‘बालगंधर्व रंगमंदिरा’तील अनुक्रमे लोकमान्-य टिळक आणि बालगंधर्वांच्या व्यक्तिदर्शनात्मक चित्रांमुळे. चित्रकलेच्या क्षेत्रात त्यांच्या कामाइतक्याच त्यांच्याबद्दलच्या खऱ्याखोट्या वदंता प्रसिद्ध आहेत.
गोपाळ देऊसकर हे मराठी चित्रकार होते. १९२७-३६ दरम्यान मुंबईच्य जे.जे. स्कूल ऑफ आर्ट या मानांकित संस्थेत त्यांनी चित्रकलेचे पद्धतशीर प्रशिक्षण घेतले. पुढे निजामाने खास शिष्यवृत्ती देऊन चित्रकलेच्या प्रगत अभ्यासाकरता त्यांना युरोपात पाठवले. १९३४, १९३६, १९३८ साली लंडनमधील चित्रप्रदर्शनांत त्यांची चित्रे मांडण्यात आली होती. भारतात परतल्यावर त्यांना जे.जे. स्कूल ऑफ आर्ट संस्थेच्या डेप्युटी डायरेक्टर पदावर नेमले गेले. त्यांच्या चित्रकौशल्यामुळे बाँबे आर्ट सोसायटीने त्यांना सुवर्णपदक देऊन गौरवले. पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिर, टिळक स्मारक मंदिरातील त्यांनी रंगविलेली भित्तिचित्रे अतिशय प्रसिद्ध आहेत. फेब्रुवारी ८, १९९४ रोजी त्यांचे निधन झाले.
देऊसकर कुटुंब हे मूळचे देवास,मध्यप्रदेश येथील होते, पण नंतर अहमदनगर येथे स्थायिक झाले.तीन पिढ्यांपासून देऊसकर यांच्या घरात कलेची पार्श्वभूमी होती. त्यांचे आजोबा वामन आणि त्यांचे वडील हे मूर्तिकार होते. गोपाळ यांचे वडील मिशन हायस्कूलमध्ये चित्रकला शिक्षक होते.मोठे काका रामकृष्ण देऊसकर हे विसाव्या शतकातील गाजलेले चित्रकार होते. हैदराबाद येथील सालारजंग वस्तू संग्रहालयाच्या उभारणीत नबाबासोबत त्यांचे महत्वाचे योगदान होते.म्युझियमचे ते पहिले क्युरेटर होते.
गोपाळ देऊसकर हे दोन वर्षाचे असताना आलेल्या फ्लूच्या साथीत आई आणि वडील यांचा मृत्यू झाला. ते आणि त्यांची मोठी बहिण शांता हिचा १९२१ पर्यंत नातेवाइकांनी सांभाळ केला.नंतर ते हैदराबाद येथे रामकृष्ण देउसकर या काकांकडे सहा वर्षे राहिले. १९२७ साली त्यांनी मुंबईच्या सर जे.जे.स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला.सुरुवातीस ते खेतवाडी येथे ललितकलादर्श या नाटकमंडळीच्या बिऱ्हाडात राहिले.
चित्रकार गोपाळ देऊसकर ही कहाणी आहे त्यांच्या चित्रनिर्मितीची. बालपणीच त्यांच्यातले चित्रगुण प्रकटले. उत्तरोत्तर ते बहरत गेले. या कलेच्या जोरावर ते इंग्लंडला जाऊन रॉयल ऍकॅडमीत शिकले. भारतीय संस्थानिकांच्या राजवाडयातून वावरले. पुण्याच्या 'टिळक स्मारक मंदिरा'तील लोकमान्य टिळक जीवनदर्शन आणि 'बालगंधर्व रंगमंदिरा'तील बालगंधर्व त्यांच्या कुंचल्यातून साकार झाले. त्यांच्या कॅनव्हासवर कोटयवधींचे दागिने ल्यालेली राणी उमटली, तशीच दूध विकणारी खेडूत स्त्रीही! अशी त्यांची कित्येक चित्रे! ही कहाणी आहे देऊसकरांच्या व्यक्तिगत जीवनाची.
····
आठवणी
आठवणी
आठवणी येत नाही, त्या हळूवार उतरतात आत शांत पडलेल्या हृदयाच्या काठावर.
साठवत जावं त्यांना मन आणि अंतरंगात.
रमू द्यावं, मनसोक्त हिंडु द्यावं त्यांना..
सूर्यास्तानंतर शांत बघत बसावं समोरच्या शांत आसमंताकडे..
हळुवार येणाऱ्या वाऱ्यासोबत एकटंच बोलत बसावं..
साठवत जावं त्यांना मन आणि अंतरंगात.
रमू द्यावं, मनसोक्त हिंडु द्यावं त्यांना..
सूर्यास्तानंतर शांत बघत बसावं समोरच्या शांत आसमंताकडे..
हळुवार येणाऱ्या वाऱ्यासोबत एकटंच बोलत बसावं..
एकांताची व्याख्या माहीत आहे का?
तिथं भेटी होतात दुरावलेल्या नात्यांच्या,
बांध फुटतो विस्कटलेल्या मनातील भावनांना..!
Tuesday, July 30, 2019
आई
आई
आयुष्यात आपण अनेक नाती जोडतं असतो. प्रत्येक नात्यांचा काही तरी अर्थ आहे. काही नाती तडजोड असतात, काही नाती स्वार्थासाठी, काही नाती प्रेमापोटी तर काही नाती आपण केवळ पर्याय नसल्याचे स्वीकारत असतो. 'आई' हे एकमेव असं नातं आहे, ज्यात ना तडजोड आहे, ना स्वार्थ आहे, आणि ना हे नातं तात्पूरतं असतं. आई म्हणजे त्यागाची भावना, नात्यांचा ताजेपणा, मनातील
मांगल्य, आणि ओठांवरील हसू, डोळ्यांमधले आनंदाश्रू आणि विरहाची उत्कटता.
मांगल्य, आणि ओठांवरील हसू, डोळ्यांमधले आनंदाश्रू आणि विरहाची उत्कटता.
आजही दिवसभरात मन उदास झालं की आईची आठवण होते. आजही दु:ख झालं की वाटतं एखाद्या लहान मुलाप्रमाणे धावत जाऊन आईला बिलगावं, खूप रडावं.
सुसंस्काराचे घडविणारी मार्गदर्शन करणारी, प्रेम करणारी, माया करणारी, तत्वज्ञान सांगणारी, खडसावणारी, चुका शोधून योग्य दिशा देणारी, मदत करणारी, लक्ष ठेवणारी, काळजी करणारी, जपणारी ती आई अशा कित्येक भूमिका आई पार पाडते. आईची जागा तिच्याशिवाय कोणीच घेवू शकत नाही.
माझ्या जीवनातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे ती. प्रत्येक क्षणी, जीवनातील प्रत्येक कठीण वाटेवर माझ्या सोबत उभी राहते ती माझी आई.
मला जे चांगले संस्कार लाभले आहेत ते तुझीच देणगी आहे. मी कितीही आईबद्दल लिहिले तरी ते कमीच वाटणार.. आई बद्दल लिहावं एवढा मोठा मी नाहीय. तिने माझ्यासाठी आणि आमच्या परिवारासाठी काय केलं हे शब्दात मांडणे कठीण...
आईची ती मायाजगात कुठं शोधून मिळणारी नाही
तिच्या ममतेची छाया आई विना काही नाही
आई आहे सर्व काही करेल तितक प्रेम कमी पडते
तिच्या वाचून प्रत्येक काम अडते
तिच्या इतकी माया देईल का कोणी शोधून अशी आई ची माया आणेल का कोणी ?
आई विना जगात दुसरे नाही कुणी.......
तिच्या ममतेची छाया आई विना काही नाही
आई आहे सर्व काही करेल तितक प्रेम कमी पडते
तिच्या वाचून प्रत्येक काम अडते
तिच्या इतकी माया देईल का कोणी शोधून अशी आई ची माया आणेल का कोणी ?
आई विना जगात दुसरे नाही कुणी.......
आभाळभर पसरत असते माय
सागरभर विस्तारत असते माय
धर्म, पंथ, प्रदेश नि जाती संपवत
लेकरासाठी उभी ठाकत असते माय!!
https://www.facebook.com/photo.php?fbid=1518740308211413&set=pb.100002263746401.-2207520000.1564583539.&type=3&theater
सागरभर विस्तारत असते माय
धर्म, पंथ, प्रदेश नि जाती संपवत
लेकरासाठी उभी ठाकत असते माय!!
https://www.facebook.com/photo.php?fbid=1518740308211413&set=pb.100002263746401.-2207520000.1564583539.&type=3&theater
Monday, July 29, 2019
तथागत भगवान गौतम बुध्द
तथागत भगवान गौतम बुध्द
शाक्यपुत्र सिद्धार्थ गौतमाने सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी बुद्धगयेच्या बोधीवृक्षाखाली बसून दिव्य ज्ञान प्राप्त केले. ते ज्ञान त्यांनी स्वत:पुरते न ठेवता मानवजातीच्या व प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी त्याचा प्रसार व प्रचार केला. सतत ६० वर्षे ते आपला उपदेश करीत फिरले. त्यांचा उपदेश म्हणजेच बुद्ध धम्म होय. "धम्म' हा शब्द पारंपरिक अर्थाने धर्म नसून तो मानसशास्त्र, तर्कशास्त्र आणि नीतिमूल्याचा समन्वय असलेली जीवन पद्धती आहे.
माणसाला विज्ञाननिष्ठ, विवेकवादी, विचारशील बनविणे हे बौद्ध धम्माचे परम उद्दिष्ट आहे. सनातन परंपरा, रूढी- अंधश्रद्धा व मानवी गुलामगिरी याविरुद्ध तत्त्वेच बुद्धाच्या शिकवणुकीचा मूळ गाभा आहे. प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री त्याचे स्तंभ आहेत. नीती ही बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा पाया आहे.राष्ट्र ही एकत्वाची भावना आहे. जाती-पोटजातीत विभागलेला मानव समाज राष्ट्र म्हणून आकारला येऊ शकत नाही. समतेवर आधारित समाज रचना राष्ट्रीय एकात्मतेची पूर्व अट आहे. यास्तव बौद्ध धम्माची शिकवण जनतेत रुजविणे काळाची गरज आहे.
प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री हे सद्गुण माणसात रूजावेत; स्वातंत्र्य, समता, बंधुता यावर आधारित समाज निर्माण व्हावा म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाची रचना करताना या बुद्ध तत्त्वांचा जाणीवपूर्वक अंतर्भाव संविधानात केला. बुद्ध तत्त्वज्ञान प्रत्येक भारतीयाला सतत प्रेरणादायी ठरावे म्हणून तिरंग्यावर "अशोकचक्र' कोरले आणि "त्रिमूर्ती'ला राजमुद्रा म्हणून मान्यता मिळवून दिली. भारताच्या राष्ट्रपतींच्या खुर्चीवर "धम्म चक्र प्रवर्तनाय' हा बुद्धाचा प्रथम संदेश कोरला. या सर्व बाबींचा मूळ हेतू हाच की भारत एक धम्मशासीत राज्य निर्माण व्हावे आणि एक उज्ज्वल राष्ट्र घडावे. सारा भारत बौद्धमय व्हावा, ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आंतरिक इच्छा होती.
सध्याच्या परिस्थितीत धम्मशासीत पिढी निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी बालपणापासूनच मुलांना विज्ञाननिष्ठेचे मानवी मूल्याचे व विवेकाचे धडे देणे गरजेचे आहे. माणूस केवळ भाकरीवर जगत नाही. कारण त्याला मन आहे. त्या मनाला विचाराचे खाद्य पाहिजे. धम्म माणसाच्या हृदयात आशा निर्माण करतो. त्याला काम करण्यास प्रवृत्त करतो. बौद्ध धम्माला काळ आणि देश यांचे बंधन नाही. तो कुठल्याही देशात भरभराट पावू शकेल.
"बौद्ध धर्म' या ग्रंथाचे कर्ते ई. जे. मिल्स यांनी असे स्पष्ट प्रतिपादन केले की, ""बौद्ध धम्माइतका दुसऱ्या कोणत्याही धर्मात ज्ञानाच्या मूल्यावर आणि अज्ञानाच्या हिनतेवर भर दिलेला नाही. डोळे उघडे राखण्याबाबत दुसऱ्या कोणत्याही धर्मात इतका भर दिलेला नाही.''
प्रा. डब्ल्यू.टी. स्टेस आपल्या "बौद्ध धर्मीय नीतिशास्त्र' या ग्रंथात म्हणतात,""ज्ञान हे मुक्तीसाठी आवश्यक आहे आणि ते प्राप्त करण्यात अपयश येण्याची जी दोन कारणे आहेत त्यापैकी अज्ञान हे एक आहे तर दुसरे कारण तृष्णा आहे, असे बौद्ध धम्माने आग्रहपूर्वक सांगितले आहे.''
प्रगतिशील जगाला सर्वोच्च शिकवण देण्यासाठी बौद्ध धम्माचीच आवश्यकता आहे. विज्ञान हे बुद्धिप्रामाण्यवादाचे दुसरे नाव आहे. बुद्धाचा धम्म हा बुद्धिप्रामाण्यवादावर अधिष्ठित आहे. भगवान बुद्धाने सांगितलेला "अनित्यतेचा सिद्धांत' खरा ठरला आहे. बौद्ध धम्माने मानवात प्रच्छन्न असलेला अंत:सामर्थ्याच्या शोधाकडे लक्ष वेधले. सदाचारास प्रवृत्त होण्यासाठी मानसिक संस्काराचे महत्त्वही सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला परिषदेत म्हणाले होते, ""जो धर्म आपल्याला समान दर्जा देईल, समान हक्क देईल आणि योग्य तऱ्हेने वागवील अशा एखाद दुसऱ्या धर्मात जावे, असे तुम्हाला वाटत नाही काय? दुर्दैवाने मी अस्पृश्य जातीत जन्मास आलो हा काही माझा अपराध नाही. परंतु, मरताना मात्र मी हिंदू म्हणून मरणार नाही.'' यावेळी निश्चितच डॉ. आंबेडकरांच्या मनात बौद्ध धम्म अधिष्ठित झालेला होता.
"गौतम बुद्धाचे चरित्र' हे पुस्तक बाबासाहेबांनी बालपणीच वाचले होते. तेव्हापासून बुद्ध तत्त्वज्ञानाचे कित्येक ग्रंथ त्यांनी वाचले होते. बुद्धाच्या संदेशात सिद्धांत आणि सामाजिक सुधारणा यांचे संकलन आहे. बुद्धाचा विचार हा एक सामाजिक संदेश आहे. बौद्ध धम्म प्रज्ञा शिकविते, करुणा शिकविते, समता शिकविते, या जगात सुखी आणि उत्तम जीवन जगता येण्यासाठी माणसाला याच गोष्टींची गरज आहे. विज्ञान जाणणाऱ्या आधुनिक माणसाला जर धर्म हवाच असेल तर बुद्धाचा धम्म याच एका धर्माचा स्वीकार करणे त्याला शक्य होईल, असे डॉ. आंबेडकरांनी प्रतिपादन केले.
बुद्धजयंतीच्या वेळी नवी दिल्ली येथे एका सभेत बोलताना डॉ. आंबेडकर म्हणाले, "बौद्ध धर्म नीतीवर अधिष्ठित आहे. बुद्ध हा मार्गदाता आहे. बौद्ध धर्मात देवाची जागा नीतीने घेतलेली आहे. धर्म या शब्दाचा क्रांतिकारक अर्थ बुद्धाने विचारार्थ मांडला. बौद्ध धर्म हा समतेसाठी उभा आहे.
२९ सप्टेंबर १९५० रोजी वरळी येथील बौद्ध मंदिरामध्ये भाषणात डॉ. आंबेडकर म्हणाले, ""आपल्या हालअपेष्टा थांबविण्यासाठी लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारावा. आपले उर्वरित आयुष्य बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन आणि प्रसार करण्यासाठी व्यतीत करीन.'' १४ ऑक्टोबर १९५६ मध्ये नागपूरच्या नागभूमीवर त्यांनी धम्मचक्र फिरविले. इतिहासात अभूतपूर्व असा धम्मदीक्षेचा सोहळा संपन्न झाला. मनुष्य हा धर्माकरिता नसून, धम्म हा मनुष्याकरिता आहे. बुद्धाविषयी डॉ. आंबेडकर म्हणतात, "Buddha was the first teacher in the world, who made morality the essence and foundation of religion. ''
बुद्ध धम्माला देव-दैव, आत्मा-परमात्मा, पुनर्जन्म, कर्म या बाबी मान्य नाहीत. अंधश्रद्धा, रूढी-परंपरा बुद्धाने त्याज्य मानल्या आहेत. बुद्ध धम्मात जात, उच्च-निचता नाही. स्त्री-पुरुष समानता बुद्धाने मान्य केलेली आहे. सर्वांना समान संधी बहाल केली आहे. "बहुजन हिताय, बहुजन सुखाय' हे बुद्धाचे वचन आहे. "अत्त दिपो भवं' हा बुद्धाचा महान संदेश आहे.
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनीसुद्धा "होवो बुद्धाचे पुनरागमन' अशी कविता करून भारतात बुद्धाच्या पुनरागमनाची वाट पाहिली.
आज जगात आतंकवाद वेगाने पसरत आहे. मानवी मूल्याचे अवमूल्यन होत आहे. सीमावाद, प्रांतवाद गतिमान होत आहे. स्त्रियांवर रोजच अत्याचार होत आहे. देव- दैववाद डोके वर काढत आहे. कुजलेल्या जीर्ण रूढी- परंपरा पुनरुज्जीवित केल्या जात आहेत. एकाचे मंदिर पाडून दुसरा आपले मंदिर बांधत आहे. राजकारणाच्या नावाने हुकूमशाही वाढीस लागत आहे.
नवीन पिढी वेगाने व्यसनाधिनतेकडे जात आहे. न्याय व्यवस्था लुळी झालेली आहे. जाती व्यवस्था पुन्हा मूळ धरू लागली आहे. शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात देवी-देवतांचे प्रस्थ वाढत आहे. दूरदर्शनवर देव, अंधश्रद्धा, भूत- पिशाच्च यांचे आक्रमण सुरू आहे. या सर्व बाबींना दूर सारण्यासाठी आणि माणसाला सुखी व समृद्ध जीवन जगण्यासाठी बुद्ध तत्त्वज्ञानाची नितांत गरज आहे. यासाठी प्रत्येक बौद्ध म्हणविणाऱ्या उपासक-उपासिका, भिक्खू तथा भिक्खू संघ यांनी महायान- हीनयान या वादात न पडता सांघिक प्रयत्न करण्याची कालसापेक्ष गरज आहे. डॉ. आंबेडकर यांच्या शब्दांत "जग हे धम्म राज्य निर्माण होण्याची गरज आहे.
विश्वाला शांततेचा संदेश देणारे विश्ववंदनीय, महाकारूणीक, तथागत भगवान गौतम बुद्धास ञिवार वंदन
मला पाऊस खूप आवडायचा..
■मला पाऊस खूप आवडायचा..
मला पाऊस खूप आवडायचा
मला ती पण खूप आवडायची
पावसात समोरून येणारी ती,
खूप छान दिसायची
म्हणून मला पाऊस खूप आवडायचा..
एका हाताने छत्री सावरत
एका हाताने ओढणी आवरत
अशी सावरत-आवरत चालणारी ती,
खूप छान दिसायची
म्हणून मला पाऊस खूप आवडायचा..
चिखलातून हळुवार पाय टेकवत
पैंजनाचा आवाज करत,
कडेकडेने चालणारी ती,
खूप छान दिसायची
म्हणून मला पाऊस खूप आवडायचा
पावसाच्या सरी हातावर झेलत
चोरून बघून, हळूच लाजत
नजरा नजर होताच पळत जाणारी ती,
खूप छान दिसायची
म्हणून मला पाऊस खूप आवडायचा
आता पाऊस नाहीय
पैंजनाचा आवाज येत नाही
चोरून बघणारी ती पण नाहीय,
आवडणारी ती पण नाहीय
म्हणून हल्ली मला पाऊस आवडतच नाही..
भावेश रतिलाल सोनार
माझी आजी
माझी आजी
"आजी" ची एक युनिव्हरसल डेफिनेशन आहे...
आई-बाबांकडून ओरडा खाल्यावर किंवा खायच्या आधी जाण्याची सेफेस्ट जागा म्हणजे "आजी"
"मिले सूर मेरा तुम्हारा" तल्लीन होऊन ऐकणारी आजी...
आजी म्हटले की आठवते ते कधी ना संपाव असा वाटणारे तेल मालिश...
मुळात ‘आजी’ हे रसायनच वेगळे असते. बालपणी आपल्याला आजी गोड गोड गोष्टी सांगणारी आजी, गाणे गात व पाठ थोपटीत झोपवणारी आजी, कुठे दुखले – खुपले तर हळदीचा लेप लावणारी आजी, कुणी आमच्यावर रागावले तर आमची बाजू घेऊन भांडणारी आजी, परीक्षेत पास झाल्यावर कौतुक करीत रुपया हातावर ठेवणारी आजी, आजारपणात जागरण करीत उशाशी बसून राहणारी आजी ! आजीची किती रूपे आठवावीत ? प्रत्येकाची आजी अशी असतेच ; पण माझी आजी वेगळीच होती. बाकी आज्या करतात ते ती करायची, शिवाय तिच्यात आणखी वेगळेपण होते.
माझी आजी म्हणजे आईची आई ! आजीचं नाव आशा आहे. प्रेमळ, जीवला जीवलावणारी. माझी आजी माझ्यासाठी खरंच मोठी आहे. बालपणी मी तिच्याकडच शिकलो. म्हणून मला तिची सोबत जरा जास्तच मिळालीय. माझा शाळेचा ड्रेस धून, सकाळी उठून डब्बा बनवणं, अभ्यास घेणं हे सगळं तिचं बघायची. मावशी हि होतीच.. जेवण करून घेरे - जेवण करून घेरे हे मी जेवण करत नाही तोवर बोलायची. आजीला शिक्षणाचे खूप वेड होते. पैशांचे बळ नसले तरी महत्वाकांक्षा अफाट ! चांगलं शिक म्हणजे मोठा होशील. आमच्या सारखे असं काम नाही करावे लागणार. चांगला शिकला म्हणजे चांगली नोकारी लागेल. चांगले पैसे कमावशील. चांगलं रहायचं चांगलं वागायचं असं सतत सांगत असते. अजूनही सांगते. लहानपणा पासून तिच्या कड असल्याने तिची संगत मला लाभली तिनेच काही चांगल्या गोष्टी शिकवल्या. नाती-गोती सांभाळणं, नाती जपणं हे तिच्याकडून शिकावं, परिस्थिती नसतानाही तिने काधी कोणत्या गोष्टीची कमी नाही पडू दिली. ज्या गोष्टी मला कळत नाही त्या गोष्टी मला न रागवता सांगते. मला माझ्या आजी कडून कोणताच त्रास नाही. तिला माहित आहे. की मला कोणते पदार्थ आवडतात ती मला आवडीने काही ना काही बनवून देते. आजी अप्रतिम बेसनाचे लाडू बनवते ज्यांची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. आजी बद्दल किती लिहु आणि किती नको...
आणि काही गोष्टी लिहीण्या पेक्षा. मनाच्या कोपर्यात सांभाळून ठेवलेल्या बर्या. लहान लहान अनुभव. काही गुपित.... हा प्रत्येकाचा खजिना असतो.... प्रत्येक छोटी आठवण ही आयुष्याच्या घाई-गर्दी मधे येणारी एक गार वार्याची झुळुक असते..
पण आजी म्हटले की वाटत सगळ काही सोडून द्याव.. आणि आजी च्या मांडीत डोक ठेवून झोपाव.... परत एकदा लहान ह्याव... परत एकदा आजी म्हणत असलेल्या चिऊ काऊंच्या गाण्यात हरवून जाव....
आणि कधी झोप लागली ते कळूही नये...
पावसाचा साज
तुझ्यासाठी मी पावसाचा साज आणलाय !
एक एक थेंबाची मोहनमाळ बनवलीय,
टपोऱ्या पेंगोळ्यांचे झुमके आणलेयत.
मंद धुक्यातील हिरवळीचे काकन आणलेयत,
टपटप नाऱ्या मोत्यांचे पैंजण सुद्धा आणलंय.
भरून आलेल्या आभाळाची काजळ रेषा तुझ्या पापणीवर,
तुफान वादळाचा नाद घुमूदे पदरभर.
मला आवडतो म्हणून मातीच्या सुगंधाचे अत्तर लावून बघ,
गोजिरवाण श्रावण फुल तुझ्या लांब केसात मळून घे.
नखशिखांत पावसालाही तुझ्या सौंदर्याचा मोह होतोय!
तुझ्यासाठी मी पावसाचा साज आणलाय!
-भावेश सोनार
ती
तस मी आणि ती भेटलो की रोजच खूप गप्पा होतात.
मनातील अगदी मोकळेपणाने सगळं मी तिला सांगत असतो..
आणि ती ही सगळं काही ऐकून घेते, समजून घेते,
ती सतत माझ्या विचारात असते..
आणि मी स्वप्नात..
पण ही विचारातील भेट मात्र वेगळीच आहे
इथं ही जग आहे, नवीन विचार आहे, आवडी निवडी आहेत, रुसवे फुगवे आहेत
चहा आहे, कॉफी आहे,
अगदी प्रेम आणि स्वप्न सुद्धा..
प्रतक्ष मात्र तिचं आणि माझं भेटणं अवघड असतं
आणि ते कधीच शक्य नाही असं वाटतं..
ती खऱ्या आयुष्यात कशातच नाही..
पण विचारात तिच्या शिवाय दुसरं कुणी नाही..
मी या सगळ्यात जरी असलो तरी विचारांत ती ही माझ्या सोबत असते नेहमी,
आणि प्रत्यक्ष शक्य नसलं तरी आमची ही विचारांची भेट खरंच खूप सुंदर आहे..
- भावेश सोनार
Subscribe to:
Posts (Atom)